लाडली योजना म्हणजे महिलांची दिशाभूल – कॉ. राजेंद्र साठे
नागपूर ( जिल्हा प्रतिनिधी जयंत साठे ) लाडली योजना म्हणजे राज्यातील महिलांची महाराष्ट्र शासनातर्फे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दिशाभुल करीत असल्याची टीका आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सी आय टी यू) नागपूर चे अध्यक्ष कॉ. राजेंद्र साठे यांनी एका पत्रकाद्वारे केली. राज्याच्या बजेट मांडताना वित्तमंत्री अजित पवार यांनी राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेमध्ये सामावून घेणे, आशा वर्कर – गटप्रवर्तक यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करणे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करणे हे काम न करता जो वित्तमंत्री लोकसभा निवडणुकीमध्ये स्वतःच्या बहिणीच्या विरोधात बायकोला उभा करत असेल, त्याला लाडली बहना म्हणण्याचा अधिकार नाही. नरेंद्र मोदी सारखे मेरी प्यारी बहना म्हणणारे आजपर्यंत बहणा करता काही करू शकले नाही. तर हे काय करणार? ही घोषणा म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महिलांची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे हे जनतेच्या लक्षात आलेले असून जनता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हे स्पष्ट होते. आशा कर्मचारी किंवा अंगणवाडी कर्मचारी वारंवार आपल्या अधिकारा करता रस्त्यावरून आंदोलन करतात त्यानंतर सुद्धा शासनाला जाग येत नाही. त्यांच्याकडे शासन दुर्लक्ष करतो त्यामुळे या योजनेचा महिला मध्ये तीव्र संताप आहे. लाडली योजनेच्या नावाने पंधराशे रुपये महिलांना देण्याचा जो प्रकार आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या कर्मचारी किंवा स्वयंसेविका यांना मोबदल्या पासून वंचित राहावं लागेल. परंतु ज्यांना लाभ देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे त्याकरता कागदपत्रांच्या अटी पूर्ण करणे कठीण आहे त्यामुळे ही योजना फसवी आहे. असे आपल्या पत्रकामध्ये कॉम्रेड राजेंद्र साठे यांनी म्हटले.