“ओबीसी जनगणना संकल्प यात्रा” “ओबीसी एल्गार मोर्चा” दिनी 11 फेब्रुवारी ला वणीत दाखल होणार...
सुरेंद्र इखारे वणी:–* ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करून भारताच्या लोकसंख्येत मोठा घटक असलेल्या समाजाला न्याय द्यावा, या मागणीसाठी विदर्भात ओबीसी जनगणना संकल्प यात्रा सुरु करण्यात आली आहे. सेवाग्राम वरून निघालेल्या या यात्रेचे रविवारी 11 फेब्रुवारी 2024 ला वणीला आगमन होणार आहे आणि ही यात्रा वणीत आयोजित ओबीसी एल्गार मोर्चात सामील होणार आहे.
उमेश कोराम आणि अनिल डहाके यांच्या नेतृत्वात 3 फेब्रुवारीपासून सेवाग्राम येथे महात्मा गांधी यांना अभिवादन करून यात्रेला सुरुवात करण्यात आली.
बिहार राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करून डेटा उपलब्ध करून द्यावा म्हणजे सर्वोच्च न्यायालय अथवा सरकारला ओबीसी बाबत धोरण ठरविताना अनेक अडचणी येतात त्या दूर व्हाव्या आणि मंडल आयोगाने 1931 च्या जनगणनेच्या आधारावर ठरवलेल्या 52 टक्के ओबीसींवर होणार अन्याय दुर करावा, यासाठी ही ओबीसी जनगणना संकल्प यात्रा निघालेली आहेत.
तरी वणीकरांनी ओबीसी जनगणना संकल्प यात्रेचे जंगी स्वागत करावे, असे आवाहन ओबीसी जातनिहाय जनगणना कृती समिती कडून करण्यात येत आहेत.