मारेगाव येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात
‘संविधान गौरव महोत्सव’सुरेंद्र इखारे वणी :- भारतीय संविधानाला देशांमध्ये लागू होऊन 75 वर्षे पूर्ण झाले आहेत.म्हणून महाराष्ट्र शासनाने फेब्रुवारी 2025 हा महिना संविधान गौरव महोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव येथे इतिहास व राज्यशास्त्र विभागाकडून संविधान गौरव महोत्सव दिनांक 24 फेब्रुवारी व 25 फेब्रुवारी या दोन दिवसात विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला आहे.
यामध्ये संविधानावर आधारित व्याख्यान, प्रश्न मंजुषा, वक्तृत्व स्पर्धा महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. तानाजी माने लोकमान्य महाविद्यालय वरोरा येथून उपस्थित होते. देशाचा प्रगतीचा मार्ग संविधानातून जातो असे प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी बोलताना केले. संविधानात आपल्या लेखणीतून जे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडले ते विचार आज प्रत्येक माणसाने प्रत्येक्ष कृतीत आणण्याची गरज आहे असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे सरांनी व्यक्त केले. याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत 210 विद्यार्थी सहभागी झाले होते. तर वक्तृत्व स्पर्धेमध्ये एकूण 25 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. वक्तृत्व स्पर्धेमध्ये राष्ट्र उभारणीत संविधानाची भूमिका, संविधान व व्यक्ती स्वातंत्र्य, सामाजिक विकास व संविधान या विषयावर स्पर्धकांनी आपले विचार मांडले. प्रश्न मंजुषा परीक्षेत विशाल टेकाम,कामकार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक इतिहास विभाग प्रमुख डॉ. गजानन सोडनर यांनी केले तर वक्तृत्व स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रा. प्रवीण पोटे सर यांनी केले. याप्रसंगी मंचावर डॉ. माधुरी तानुरकर, डॉ.विनोद चव्हाण, प्रा.बाळासाहेब देशमुख हे होते. वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. हेलगे सर व प्रा. अक्षय जेनेकर हे होते. प्रा. माधुरी शेंडे यांनी वेळ नियंत्रकाची भूमिका निभवली. कार्यक्रमाचे आभार शैलेश कांबळे व प्रा.अस्मिता ढवस यांनी मानले.याप्रसंगी प्रा. प्रदीप माकडे, डॉ. विभा घोडखांदे, डॉ. प्रवीण कुलकर्णी, डॉ. सुधीर चिरडे, प्रा. सूर, प्रा. संतोष किनाके, डॉ. गणगणे मॅडम, डॉ. अनिल आडसरे, डॉ.शैलेश आत्राम तसेच शिक्षकेतर कर्मचारी रुंद व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता इतिहास व राज्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.