10 वि व 12 वि शालान्त प्रमाणपत्र परीक्षा कॉफीमुक्त अभियान जनजागृती सप्ताह
सुरेंद्र इखारे वणी:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी 10 वि व 12 वि ची परीक्षा मंडळातर्फे आयोजित करण्यात आली आहे.
दोन्ही परीक्षांना राज्यातून 31 लाख विद्यार्थी प्रविष्ट होणार असून सदर परीक्षेत विविध मार्गांनी होणाऱ्या गैरप्रकारांना मंडळाला सातत्याने सामना करावा लागतो. त्या दृष्टीने राज्यातील नऊ विभागीय मंडळे आपापल्या स्तरावर विविध उपाययोजना व उपक्रम राबवित आहे. त्या अनुषंगाने गैरमार्गा विरुद्ध लढा तसेच परीक्षेच्या संदर्भात सर्व सूचना देऊन उद्बोधन केलेले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या 100 दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत मा शिक्षणमंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व शाळांमध्ये 20 जानेवारी ते 26 जानेवारी या कालावधीत कॉफीमुक्त अभियानांतर्गत जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.
10 वि व 12वि ची परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी विद्यार्थी ज्या परीक्षा केंद्रावर प्रविष्ट होणार आहेत. त्या परीक्षा केंद्रासाठी केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परिक्षेशी संबधीत व्यक्तींची नियुक्ती सदर केंद्राव्यतिरिक्त इतर अन्य माध्यमिक विद्यालय/ उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचार्यांमधून करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे.
कॉफीमुक्त अभियानांतर्गत जनजागृती करणे तसेच केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परिक्षेशी संबधीत व्यक्ती यांच्या नियुक्ती संदर्भात राज्यातील सर्व विभागीय मंडळे ,विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी व शिक्षण निरीक्षक याना कारवाई करणेबाबत सूचित करण्यात आले आहे.